पोस्ट्स

एप्रिल, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डाळिंबातील तेल्या रोग- कारणे व उपाययोजना- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77 2009 2011)

इमेज
डाळिंबातील तेल्या रोग- कारणे व उपाययोजना- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77 2009 2011 ) डाळिंबावरील तेल्या रोगावर अजूनही १००% कंट्रोल देणारे एकही औषध बाजारपेठेत उपलब्ध नाही...जर कोणी तुम्हाला महागड्या किमतीत अशी औषधे देत असतील तर ते निव्वळ आपल्या या रोगाबद्दलचा अज्ञानीपणाचा फायदा घेऊन आपला खिसा भरत आहे असे समजावे...अशा लोकांकडून १०० रुपयांचे स्टॅम्पवर लिहून घ्यावे कि तुमची औषधे वापरल्यावर आमच्या तेल्यायुक्त बागेत जुलै-ऑक्टोबर या काळात तेल्याचे एकही फळ आढळणार नाही. नंतरच मग अशी औषधे वापरण्यास सुरुवात करावी. मुखत्वे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव हा जुलै ते सप्टेंबर या कालावधीत होतो. बागेतील आद्रता, अतिरिक्त सिंचन,अस्वच्छता, झाडांची अति गर्दी व योग्य प्रकारच्या फवारणीचा अभाव इत्यादी कारणांमुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव बागेत वाढत जातो.  माझ्या आतापर्यंतचा अनुभवात असे लक्षात आले कि, तेल्या रोगासाठी लोक अतिरिक्त फवारणी करत जातात. एकामागून एक अँटिबायोटिक, विविध ऍसिड, तेलब्या..तेल्या विनाश इत्यादी बिनबुडाचे फवारणीचा वापर करतात.  ***इथे तेल्या रोगामुळे झाड आधीच अशक्त...

आगामी 2 वर्षांतील डाळिंबाची परिस्थिती - श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन: 77 2009 2011)

इमेज
आगामी 2 वर्षांतील डाळिंबाची परिस्थिती- श्री सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77 2009 2011) जितके डाळिंब क्षेत्र वाढते आहे.. तितकेच क्षेत्र कमी देखील होत आहे..याला खालील काही कारणे कारणीभूत आहेत. - मररोगाचे वाढते प्रमाण - तेल्या रोगाचा प्रादुर्भाव - पाण्याची कमी उपलब्धता - नवीन डाळिंब बागायतदारांना डाळिंब उत्पादित करताना येणाऱ्या अनंत अडचणी. - बाजारभावाची अशाश्वतपणा त्यामुळे नगद पिके(ऊस इत्यादी) व इतर जोडधंदे/व्यवसाय (पॉलिहाऊस,दूधधंदा,शेळीपालन) इत्यादींकडे तरुण शेतकऱ्यांचा वाढलेला कल. सध्या गुजरात राजस्थान इत्यादि अनेक भागांत तसेच महाराष्ट्राच्या देखील अनेक भागांत डाळिंब क्षेत्र प्रचंड वाढले आहे. या वाढलेल्या क्षेत्रांमुळे यावर्षी बाजारभाव थोडे कमी राहिले पण इतकेही कमी पण नाही. आता या सर्व भागांत एक गोष्ट सारखी आहे. ती म्हणजे, - नवीन जोमदार जमीन - नवीन झाडे - बहुदा न कसलेली जमीन यामुळे होतंय असे कि..जुन्या डाळिंब बागांमध्ये ज्या समस्या जाणवत आहेत(तेल्यारोग/मररोग/निम्याटोड/फुले निघताना येणाऱ्या अडचणी-नरफूल/फुलगळ इत्यादी) तसेच रोगांचा प्रादुर्भाव इत्यादी या नवीन जमिनीत प...

डाळिंब बाजारभाव- सद्यस्थिती - आगामी अंदाज - श्री सुशांत सुर्वे.

इमेज
डाळिंब बाजारभाव- सद्यस्थिती - आगामी अंदाज - श्री सुशांत सुर्वे.  डाळिंब बाजार सध्या काय चालू आहेत तसेच आगामी काही दिवसांत बाजारभाव काय राहतील याबद्दल विचारणा केली होती तर त्याबद्दल काही गोष्टी. - डाळिंब बाजारभाव पूर्णतः खात्रीलायक कधी वाढतील कधी कमी होतील याबद्दल शाश्वत माहिती देता येत नाही. - बाजारातील मागणी व पुरवठा नुसार बाजारभाव ठरत राहतात. - सध्या डाळिंबाचे बाजारभाव गुणवत्ता साईझ नुसार 40-60 रुपये प्रति किलो बाजारभाव आहेत. - राजस्थान व महाराष्ट्र मधून सध्या डाळिंबाचा पुरवठा चालू आहे.  - सध्या उत्तरेकडे छटपूजा वैगरे चालू असल्याने मार्केटमध्ये डाळिंबाची विक्री तितपत नाही. - तथापि या पूजा वैगरे उरकल्यानंतर आगामी 8-10 दिवसानंतर मार्केट चांगल्यापैकी वाढू शकतात  - रेट वाढू शकण्याची शक्यता यामुळे आहे कि राजस्थान येथील डाळिंब पुरवठा बऱ्यापैकी कमी झाला आहे शिवाय मार्केट मध्ये आंब्याची आवक कमी आहे व रेटहि अधिक आहेत...शिवाय वातावरण देखील बऱ्यापैकी उष्ण झालेले आहे त्यामुळे डाळिंबाची मागणी वाढते आहे.  - शेवटी मागणी व पुरवठा इत्यादींवर मार्केट अवलंबून अ...

डाळिंबातील फुलगळ- कारणे व उपाययोजना - श्री सुशांत सुर्वे

इमेज
     डाळिंबातील फुलगळ- कारणे व उपाययोजना - श्री सुशांत सुर्वे  मादी फुलांची जास्त प्रमाणात गळ होण्यास वातावरणातील बदल, काडीतील स्टोरेज या समस्या जास्त कारणीभूत ठरल्या.  तसेच थ्रिप्स, बुरशीजन्य रोग, पाणी व्यवस्थापन, काडीतील स्टोरेज या गोष्टी देखील तितक्याच प्रमाणात कारणीभूत असतात.  सध्या दिवसाचे तापमान जास्ती आणि रात्रीचे तापमान कमी अशी बऱ्याच ठिकाणी परिस्थिती आहे, त्यात मग झाडांवर जैविक अजैविक ताण इत्यादी गोष्टींतून फुलांची गळ होण्याची प्रमाण वाढले आहे. बऱ्याच वेळा पाऊस पडून गेला कि पाणी द्यावे कि देऊ नाही असा बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो आणि मग परत पाणी न दिल्याने गळ व पाऊस पडून  गेल्यावर देखील पावसाच्या आधी जितके पाणी चालू होते तेव्हडे पाणी दिल्याने बागेत अतिरिक्त ओलावा झाल्याने होणारी फुलगळ...अशा नानाविध कारणे फुलगळीस कारणीभूत आहेत.  बागेतील प्रत्यक्ष भेटीतून नेमकी फुलगळ कशाने होते हे समजण्यास संधी मिळते तथापि वर दिलेली कारणे व त्या अनुषंगाने खाली काही उपाययोजना दिल्या आहेत, त्यानुसार बागेतील फुलगळ थांबण्यास/ कमी होण्यास आपण...

विश्रांती काळातील डाळिंब बाग नियोजन- श्री सुशांत हिरालाल सुर्वे.

इमेज
विश्रांती काळातील डाळिंब बाग नियोजन- श्री सुशांत हिरालाल सुर्वे.  विश्रांतीच्या काळात बागेची काय काळजी घेतली पाहिजे या विषयी बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारणा केली...लिखाण करून संपवावा असा हा विषय नाही..पण खाली काही फवारणी व आणखी काही नियोजन सांगितले आहे...ते नीट अवलंबले तर निश्चितच चांगली फळधारणा होण्यास काहीही अडचण येणार नाही...!! *आधीच्या बहार मध्ये फळ निघून गेल्याने झाडांतील जवळपास सर्वच ताकत निघून गेलेली असते,परिणामी झाडाच्या काडीतील अन्नद्रव्ये स्टोरेज पूर्णतः संपलेले असते..अशा वेळी फळ निघून बाग ताणावर सोडायच्या आधी झाडाला NPK खतांची योग्य अशी मात्रा द्यावी..जेणेकरून झाडात परत ताकत निर्माण होईल..काही शेतकरी एकदा बागेतील फळ निघून गेले कि परत पुढची पानगळ करायच्या वेळीस बागेत येतात...मित्रहो असे ढिसाळ नियोजन चालत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचं ठरलं तर बाळंतीण बाई 9 महिने बाळ आपल्या पोटात वाढविते..त्याच्या पोषणावर तिची सर्व ताकत खर्च होते..व डिलिव्हरी झाली कि आपण तिला खारीक खोबरे..इतर पोषणहार खाऊ घालतो जेणेकरून तिची कमी झालेली ताकत पुन्हा भरून येईल...मित्रहो इथे डाळिंबाचे ...

अनारकिंग नवसंजीवनी - एक जैविक उत्पादन : अधिक माहितीसाठी संपर्क 7720092011

इमेज
अनारकिंग नवसंजीवनी - एक जैविक उत्पादन : अधिक माहितीसाठी संपर्क 77-2009-2011 अनारकिंग नवसंजीवनी हे एक जैविक उत्पादन आहे जे कि डाळिंब तसेच अन्य सर्व फळपिके भाजीपाला इत्यादींमध्ये साईझ/ग्रीनरी/पानांची क्वालिटी/अपटेकिंग इत्यादींसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करते. प्रति एकर ५ लिटर या प्रमाणात ड्रीपद्वारे हे औषध सोडता येते. १००% जैविक असल्याने कमी खर्चात/निसर्गाची कोणतीही हानी न करिता डाळिंब बागेत उत्कृष्ट रिझल्ट्स साठी अनारकिंग नवसंजीवनी वापरता येते. फक्त जयकिसान कृषी मार्फतच संपूर्ण महाराष्ट्रात याची डिलिव्हरी ट्रान्स्पोर्टद्वारे केली जाते. ज्या शेतकरी बांधवानी याचा रिझल्ट घेतलेला आहे त्यांनी पुनः उत्पादनाची मागणी नोंदवली आहे. डाळिंब बागेत कशा पद्धतीत त्याचा  रिझल्ट्स  दिसतो हे आपण खालील काही फोटोतून पाहू. आपल्यातीलच ज्या बागायतदारांनी हे वापरून बघितलेले आहे त्यांच्याच बागेतील हे ठराविक फोटो आहेत. वरील फोटो हे अनारकिंग सोडायच्या आधीचे व नंतरचे फोटो दाखवतात. काळ्या कलरचा टेप फळावर चिटकवल्यानंतर अगदी ८-१० दिवसांतच त्यात बराच गॅप पडतो, या ...

डाळिंब मररोग

इमेज
डाळिंबातील मररोग - इत्यंभूत माहिती - श्री सुशांत सुर्वे  डाळिंबातील मर रोग** सुशांत हिरालाल सुर्वे जयकिसान कृषी सेवा केंद्र चिखली संगमनेर फोन: ७७-२००९-२०११ डाळिंबातील मररोग, तेल्या रोग हे प्रामुख्याने दोन रोग अनेक डाळिंबबागायतदारांना आपल्या बागा लवकरात लवकर उपटविण्यास भाग पाडतात. आज या तेल्या रोग व मर रोगावर १००% कोणताही उपचार नाही. पण त्यांचा प्रसार थांबविणेही अशक्य नाही. अनेक लोक बागेतील या रोगांमुळे त्रासले आहे व आपल्या बागा उपटण्याच्या तयारीत आहे. मित्रांनो, माझ्या या क्षेत्रातील अनुभवावरून मला असं लक्षात आले कि...डाळिंबाची लागवड जेवढी झपाट्याने वाढत आहे... त्याच प्रमाणात डाळिंबाचे झाडे उपटणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. मागच्या वर्षी पण खूप लोकांनी आपल्या बागा जमीनदोस्त केल्या. तेल्या व मररोग या दोन रोगांमुळे बागा उपटल्या गेल्या परिणामी यंदा डाळिंबाला मागणी जादा व उपलब्धता कमी प्रमाणात यामुळे उच्चांकी असे भाव ४-६ महिने टिकून राहिले. अगदी मार्च एप्रिल मे महिन्यात एकाच डाळिंब बागेवर दिवसातून तीन ते चार व्यापारी जाऊन यायचे. ** डाळिंब बागायतदारांनी हे समजून घे...

डाळिंबातील तेल्या रोग- समजगैरसमज कारणे व उपाय - श्री सुशांत हिरालाल सुर्वे

इमेज
डाळिंबातील तेल्या रोग- समजगैरसमज कारणे व उपाय - श्री सुशांत हिरालाल सुर्वे  डाळिंबावरील तेल्या रोगावर अजूनही १००% कंट्रोल देणारे एकही औषध बाजारपेठेत उपलब्ध नाही...जर कोणी तुम्हाला महागड्या किमतीत अशी औषधे देत असतील तर ते निव्वळ आपल्या या रोगाबद्दलचा अज्ञानीपणाचा फायदा घेऊन आपला खिसा भरत आहे असे समजावे...अशा लोकांकडून १०० रुपयांचे स्टॅम्पवर लिहून घ्यावे कि तुमची औषधे वापरल्यावर आमच्या तेल्यायुक्त बागेत जुलै-ऑक्टोबर या काळात तेल्याचे एकही फळ आढळणार नाही. नंतरच मग अशी औषधे वापरण्यास सुरुवात करावी. मुखत्वे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव हा जुलै ते सप्टेंबर या कालावधीत होतो. बागेतील आद्रता, अतिरिक्त सिंचन,अस्वच्छता, झाडांची अति गर्दी व योग्य प्रकारच्या फवारणीचा अभाव इत्यादी कारणांमुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव बागेत वाढत जातो.  माझ्या आतापर्यंतचा अनुभवात असे लक्षात आले कि, तेल्या रोगासाठी लोक अतिरिक्त फवारणी करत जातात. एकामागून एक अँटिबायोटिक, विविध ऍसिड, तेलब्या..तेल्या विनाश इत्यादी बिनबुडाचे फवारणीचा वापर करतात.  *इथे तेल्या रोगामुळे झाड आधीच अशक्त झाले असता...

डाळिंब जयकिसान व्हाट्सअँप ग्रुपवरील प्रश्नोत्तरे - भाग ५

इमेज
डाळिंब जयकिसान व्हाट्सअँप ग्रुपवरील प्रश्नोत्तरे - भाग ५  s5/प्रश्न: कमी पाण्यात डाळिंबाचे बहार नियोजन कसे असावे..? उत्तर: कमी पाण्यात नियोजन असे फिक्स सांगता येत नाही. डाळिंबाला सुरवातीपासून शेवट्पर्यंत किमान  एक दिवसाआड एक दिवस 2 तास पाणी देणे आवश्यक आहे. पाण्याची उपलब्धता कमी असेल तर: - सेंद्रिय मल्चिंग - ड्रीप इरिगेशन - सेंद्रिय स्लरीचा वापर इत्यादी पर्याय वापरता येतात. तरीही, पाण्याची उपलब्धता हि योग्य प्रमाणात असेल तरच बहार धरावा, तसेच पाऊस पाणी च्या भरवश्यावर न बसता शेवट्पर्यंत बागेला पाणी पुरेल इतपत पाण्याची साठवणूक(शेततळे/पाणीटाकी) असावी कारण बहार धरल्यानंतर किंवा फळे काढायला काही अवधी असताना पाणी कमी पडल्याचे नुकसान अधिकहोते. यावर्षी, पाणी कमी पडले आहे तर फळ लवकर लाल करण्यासाठी काय करावे असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारला असे फळे लवकर लाल करण्यासाठी काही उपाय नसतो. एखादी गोष्ट पूर्णत्वास तिच्या ठरलेल्या कालावधीतच जाते, त्यात आपण काही प्रयोग केले तर तिथे नुकसान अधिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे, बागायत भागांत काही अडचण नाही पण कोरडवाहू ...